‘सेक्युलर’ शक्तींना टिकून राहायचे असेल, पुन्हा उभे राहायचे असेल, तर ‘धर्म’ ही बाब वजा करून चालणार नाही आणि जनतेची भाषा आपलीशी करून ‘भारतीयत्वा’च्या चर्चेचा भाग व्हावे लागेल

साधेभोळे देवभिरू लोक कधीच मुळात सांप्रदायिक नसतात. त्याचमुळे त्यांची मने वळवली जाऊ शकतात; तर बुद्धिवादी व उदारमतवादी हे कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या तुलनेत नेहमीच अधिक विद्वान व सर्जनशील आहेत. अशा प्रसंगी पुराणकथा अनर्थ घडवून आणत आहेत, म्हणून ऊर बडवत बसण्याऐवजी आपली विद्वत्ता व सर्जनशीलता यांच्या जोरावर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची, त्यांना जागे करण्याची वेळ आज आलेली आहे.......